महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

राज्यातील शेतकऱयाला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली, पण महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच शेतकऱयांना पुन्हा कर्जमाफी देण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले

या वर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱयाला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची प्रतीक्षा आहे, काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. बोगस खते बी-बियाण्यांचा सुळसुळाट आहे, पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करते. पीक विम्याचा फायदाही शेतकऱयाला मिळत नाही तर पीक विमा पंपन्यांनाच मोठा फायदा होतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे मागील सहा महिन्यांत राज्यात 1 हजार 727 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नसल्याचे ते म्हणाले.

उद्योगपतींचे कर्ज माफ, पण बळीराजा दुर्लक्षित

महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1 हजार 700 कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मोठय़ा उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारने माफ केले, पण शेतकऱयांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;