बच्चन कुटुंबात काय घडतंय? अभिषेकच्या पार्टीमधून ऐश्वर्या-आराध्या गायब

बच्चन कुटुंबात काय घडतंय? अभिषेकच्या पार्टीमधून ऐश्वर्या-आराध्या गायब

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. बेस्ट सेलिब्रिटी कपल म्हणून ओळख असलेल्या ऐश्वर्या – अभिषेक विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान अभिषेक बच्चन याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिषेक बच्चन, भाचा अगस्त्य नंदा, भाची नव्या नवेली नंदा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान देखील दिसत आहे.

सध्या अभिषेक, नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिषेक मामाचं कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याला नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांच्यासोबत डीनर पार्टी करताना स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सेलिब्रिटींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिषेक, नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांपैकी कोणीच पापाराझींना पोज दिल्या नाहीत. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर चौघेही कारमध्ये बसले आणि निघाले. फोटोमध्ये नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांच्यासाठी अभिषेक ड्राईव्ह करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत अभिषेक याला ट्रोल करत आहेत. कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या आणि ऐश्वर्या कुठे आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अभिषेक कधी ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत बाहेर का नाही जात?’.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अभिषेक याने सोशल मीडियावर घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर चर्चांनी अधिक जोर धरला. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक आणि दोन्ही कुटुंबाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील बच्चन कुटुंब एकत्र दिसलं. पण ऐश्वर्या नंतर मुलगी आराध्या हिच्यासोबत लग्नात आली. तेव्हा देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होती. सोशल मीडियावर देखील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

 

 

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये मोठ्या थाटात ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. आजही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये आराध्या हिला जन्म दिला. आराध्या आता 13 वर्षांची आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;