ऐश्वर्या राय हिने सोडले अभिषेक बच्चनचे घर?, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अत्यंत मोठा खुलासा, वाद…

ऐश्वर्या राय हिने सोडले अभिषेक बच्चनचे घर?, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अत्यंत मोठा खुलासा, वाद…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांमुळे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले असून तिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे सांगितले जात आहे. हेच नाहीतर लवकरच ती घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बच्चन कुटुंबासोबत न येता ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली. ज्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगताना दिसल्या. आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद नेमक्या कोणत्या कारणामुळे सुरू आहे, याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या संपर्कात देखील नाहीये.

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले की, माझी सर्व संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांची असेल. हेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतिक्षा हा बंगला थेट श्वेता हिच्या नावावर केला. काही वर्षांपासून श्वेता बच्चन ही तिच्या पतीसोबत राहात नाहीतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतच त्यांच्या जलसा या बंगल्यावरच आपल्या मुलांसोबत राहाते.

मुळात म्हणजे ऐश्वर्या राय हिला हीच गोष्ट अजिबात आवडत नाही. श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहात असल्याने ती नाराज आहे. यामुळेच ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडत आपले माहेर गाठले आहे. बच्चन कुटुंबांपैकी अभिषेक बच्चन हा सोडला तर इतर ती कोणाला अजिबात बोलत देखील नाही. जलवा बंगल्यातून ऐश्वर्या ही एकटीच नाही गेली तर ती आपल्या मुलीला देखील सोबत घेऊन गेलीये.

श्वेता बच्चन हिच्यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच काही फोटो व्हायरल झाले. त्या फोटोमध्ये श्वेता बच्चन ही बच्चन कुटुंबासोबत फोटोसाठी पोज देतानाही दोघींचे चेहरे बरेच काही सांगून जाताना दिसले. ऐश्वर्या रायही श्वेता बच्चन हिच्यामुळेच बच्चन कुटुंबांपासून दूर राहात असल्याचे सांगितले जातंय. लवकरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेतील, असेही रिपोर्टमध्ये सांगितले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील फोटो व्हायरल झाल्याने बच्चन कुटुंबात सर्वकाही ठिक नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले. त्यामध्ये अनंत अंबानीच्या लग्नाचे सर्व फंक्शन झाल्यानंतर ऐश्वर्या राय ही थेट मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली. कोणतेही फंक्शन असो किंवा पार्टी ऐश्वर्या राय ही एकटी किंवा आपल्या मुलीसोबत दाखल होते. बच्चन कुटुंबासोबत ती कधीच दाखल होत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;