भाजपला महाराष्ट्राचा एवढा द्वेष का? अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

भाजपला महाराष्ट्राचा एवढा द्वेष का? अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले नाही. त्याउपर अर्थमंत्र्‍यांच्या भाषणात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नव्हता. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजपला फटकारले आहे. ‘भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते?’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे.

‘ भाजपला आपले केंद्रातील सरकार वाचवायचे आहे त्यामुळे त्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी दिला हे कळतंय आम्हाला. पण य़ात महाराष्ट्राचा काय दोष आहे? महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे करदाते राज्य आहे हा दोष आहे का? देशाच्या अर्थव्यवस्थेत आम्ही जे योगदान दिले त्याबदल्यात आम्हाला काय मिळाले? अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदा तरी उल्लेख झाला का? भाजप महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केले आहेत.

”ही काही पहिलीच वेळ नाही, गेल्या दशकभरात भाजपच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राविरुद्ध हा पक्षपातीपणा सुरुच आहे. असंवैधानिकपणे सरकार स्थापन करून आणि आपल्या राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्याबदल्यात काहीच मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मिंधे राजवटीतील भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सुरू असलेली लूट. यालाच आपल्याला तोंड द्यावे लागत आहे’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;