Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या भाषणात महाराष्ट्राचा उल्लेखच नाही

Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या भाषणात महाराष्ट्राचा उल्लेखच नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या भाषणात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राचा उल्लेखच करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणूकीत भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. भाजप महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाला. त्याचा राग या अर्थसंकल्पातून काढल्याची चर्चा सध्या रंगली आहे. संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणात निर्मला सीतारामन यांनी फक्त बिहार, आंध्र प्रदेश, ओ़डीशा, झारखंड या राज्यांचा उल्लेख केला. बिहार व आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या पाठिंब्यावर सध्या केंद्र सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे या दोन राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. तर झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने केंद्र सरकारने या चार राज्यांसाठी पूर्वोदय योजना लागू केली आहे.

देशाला सर्वात जास्त करातून मिळकत ही मुंबई महाराष्ट्रातून मिळते. म्हणून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील सरकार मुंबई महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या मागे असल्याचा आऱोप विरोधकांकडून होत आहे. मुंबईतील अनेक उद्योगधंदे हे गेल्या काही वर्षात गुजरातला पळविण्यात आले आहेत. मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र देखील गुजरातला हलविण्यात आले आहे.

आता या अर्थसंकल्पात मुंबई महाराष्ट्राला अक्षरश: ठेंगा दाखवण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलबाबतीतही काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. एकंदरीत भाजपने या अर्थसंकल्पात मुंबई महाराष्ट्राकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;