Budget 2024 Nirmala Sitharaman: जाणून घ्या यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी कोणती घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पाचं वाचन केलं. यामध्ये नऊ क्षेत्रांमध्ये सरकार अधिकाधिक लक्षं देणार असल्याचं त्यांनी पहिलेच सांगितलं. तसेच गरीब, महिला, युवा वर्ग आणि शेतकरी हे या अर्थसंकल्पाच्या केंद्र भागी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी आदिवासींसाठी एक अभियान सुरू केलं जाणार असल्याची घोषणा केली.
पाच कोटी आदिवासींसाठी प्रगत गाव अभियान
आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ‘आदिवासी उन्नत ग्राम अभियान’ सुरू केले जाईल. या योजनेअंतर्गत आदिवासीबहुल गावे आणि आदिवासी जिल्ह्यांतील कुटुंबांसाठी कव्हरेज दिले जाईल. यामुळे 63,000 गावे समाविष्ट होतील, 5 कोटी आदिवासी लोकांना फायदा होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List