रत्नागिरी जिल्ह्यात पूर ओसरला; रेड अलर्ट असल्याने धोका कायम

रत्नागिरी जिल्ह्यात पूर ओसरला; रेड अलर्ट असल्याने धोका कायम

गेले आठवडाभर कोसळणाऱ्या संततधार पावसाचा जोर सोमवारी थोडा कमी झाला. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती ओसरली आहे. रविवारी आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी मंगळवारसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे धोका कायम आहे.

राजापूर शहरात गेले दोन दिवस शिरलेले पुराचे पाणी ओसरले असले तरी अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने अर्जुना नदीही इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे राजापूरकरांवर पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे. गेले दोन दिवस आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या राजापूर शहरातील व्यापाऱ्यांचा सोमवारचा दिवसही चिखल काढण्यात व साफसफाईत गेल्याने दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून संततधारेने पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुरस्थिती निर्माण झाली होती . त्यातच रविवारी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने अर्जुना व कोदवली नद्यांचे पुराचे पाणी शहरात घुसले हो . पुराच्या पाण्यात वीज वितरण कंपनीचे अनेक ट्रांसफॉर्मरही पाण्यात गेल्याने गेले दोन दिवस शहरातील अनेक भागातील वीज पुरवठाही खंडीत झालेला होता.

सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने अर्जुना नदीने गाठलेली धोका पातळी कमी झाली असली तरी अद्यापही अर्जुना नदी इशारा पातळीवर वाहत आहे . सोमवारी सकाळनंतर शहरातील जवाहर चौकासह बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी ओसरले असले तरी आजचाचा संपुर्ण दिवस व्यापारी व नागरिकाना चिखल काढण्यात व साफसफाई करण्यात घालवाला लागला आहे. परिणामी आजही व्यापाऱ्याना आपली दुकाने बंद ठेवावी लागल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे .

जवाहर चौकात असलेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर दुपारपासून एसटी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. पूर ओसरल्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने व हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राजापूर शहरावरील पुराच्या पाण्याचे संकट कायम आहे. रविवारी जगबुडी, नांरिगी, काजळी, कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला होता. हा पूर आता ओसरला आहे.सध्या कोदवली आणि जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.काजळी नदीचा पूर ओसरल्याने चांदेराई पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;