राहुल गांधी आक्रमक; पेपर फुटीचा ‘गंभीर’ मुद्दा उपस्थित करत शिक्षणमंत्र्यांवर साधला निशाणा
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET-UG पेपर लीकच्या वादावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, ‘NEET समस्या अशी आहे की देशात लाखो विद्यार्थी आहेत जे काय चालले आहे याबद्दल अत्यंत चिंतित आहेत आणि ज्यांना वाटू लागले आहे की हिंदुस्थानची परीक्षा प्रणाली फसवी आहे. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही ही परीक्षा पद्धती विकत घेऊ शकता आणि विरोधकांचीही हीच भावना आहे’. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मंत्री (धर्मेंद्र प्रधान) यांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिला आहे. मला असे वाटत नाही की त्यांना येथे काय चालले आहे याच्या मूलभूत गोष्टीही समजत नसाव्यात’.
हे प्रकरण व्यवस्थेच्या पातळीवर सोडवण्यासाठी सरकार काय करणार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
यावर धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, देशाची शिक्षण व्यवस्था फसवणूक असल्याचं म्हणणं चुकीचं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List