मी सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे… देवेंद्र फडणवीस यांचा ‘धर्मवीर-2’च्या निमित्ताने सूचक इशारा

मी सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे… देवेंद्र फडणवीस यांचा ‘धर्मवीर-2’च्या निमित्ताने सूचक इशारा

मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्यवेळ आली तर सिनेमा काढेनच, असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. उद्या गुरु पौर्णिमा आहे. त्यापार्श्वभूमीवर धर्मवीर-2 या सिनेमाच्या ट्रेलरचं आज लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करताना हा सूचक इशारा दिला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते जितेंद्र, अशोक सराफ, गोविंदा, बोम्मन ईराणी, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासह राजकीय आणि मराठी सिने इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी धर्मवीर सिनेमाचा एक किस्सा सांगितला. धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रातील लोकांना आवडला असं नाही. मी गुजरातला गेलो होतो. तिथे एक कार्यकर्ता भेटला. म्हणाला, हमने धरमवीर देखा. मला वाटलं हा जुना धरमवीर सिनेमाबाबत बोलत असावा. त्यानंतर तो म्हणाला वो शिंदे साब का पिक्चर अच्छा लगा. मग माझ्या लक्षात आलं, हा धर्मवीर बदल बोलतो. तो म्हणाला, मुझे वह पिक्चर बहुत अच्छा लगा. सबको अच्छा लगा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

25 वर्ष थांबणार नाहीत

धर्मवीर ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य माणसाला असामान्य कसा बनवतो हे आपल्याला दिघे साहेबांच्या जीवनातून पाहायला मिळतं. धर्मवीर-3 आणि धर्मवीर-4 ची तयारी करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला. तो 25 वर्ष थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्याही जीवनाची टॅग लाईन

आनंद दिघे साहेबांनी गुरु म्हणून एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवले. अशा दिघे साहेबांच्या जीवनावरील चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालं आहे. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही सिनेमाची टॅग लाईन आहे. केवळ सिनेमा पुरती ही टॅग लाईन मर्यादित नाही. एकनाथ शिंदे असतील किंवा आम्ही सर्व असू आमच्या जीवनाची टॅग लाईन हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हिणवलं तरी सोनं काय असतं…

दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे यांनी समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब त्यांना स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदे साहेब विचारांशी गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आला. दुर्देवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं.

जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची ताकद पाठीशी असते तेव्हा कितीही हिणवलं गेलं तरी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्रातील जनतेने ते हेरलं. शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं. आता धर्मवीर दोनचा ट्रेलर पाहिला. हा सिनेमा कुठपर्यंत गेला माहीत नाही. आतापर्यंत आला असेल तर त्यात आमचाही रोल असायला पाहिजे थोडासा, असं मिश्किल विधानही त्यांनी केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;