चिंब ओली मुंबई! मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, चाकरमान्यांचे हाल
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी रात्री संततधार पडल्यानंतर शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या काही तासांमध्ये मुंबईत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. अनेक भागांमध्ये रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू असून लोकलही उशिराने धावत आहेत.
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा जवळपास 10 ते 15 मिनिटं विलंबाने धावत आहे. त्यामुळे सकाळच्या शिफ्टला वेळेत पोहोचण्याची लगबग करणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्कचा शिक्का मिळत आहे. तसेच शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे.
मुंबईत शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस, रस्ते आणि लोकल वाहतुकीवर परिणाम
व्हिडीओ – गणेश पुराणिक pic.twitter.com/z1BFpLMQC3
— Saamana (@SaamanaOnline) July 20, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List