जोतिबा फुले आरोग्य योजना विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी, आरोग्य योजनेपासून सर्वसामान्य रुग्ण वंचितच

जोतिबा फुले आरोग्य योजना विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी, आरोग्य योजनेपासून सर्वसामान्य रुग्ण वंचितच

सर्वसामान्य रुग्णांना वेळीच व योग्य उपचार मिळावा यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेत सरकारने केलेले बदल विमा कंपन्यांचे खिसे भरण्याची केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. योजनेच्या बदलानुसार दीड लाखाची मर्यादा पाच लाखांची केली, मात्र या योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना मिळत नसून विमा कंपन्यांना फायदा होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने 2017 च्या दरपत्रकात बदलत करत नवीन सुधारित दर पत्रक आणावे आणि तसा जीआर काढावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन दिले आहे.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून अर्थसंकल्पात महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची दीड लाखाची मर्यादा आता पाच लाख केली. तसेच यासाठी लागणारा वाढीव प्रीमियमदेखील महाराष्ट्र सरकार संबंधित एजन्सीला भरणार आहे. परंतु ही योजना जाहीर करीत असताना सरकारचा जो मूळ उद्देश होता की, याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळालेला पाहिजे तो सफल होण्याची शक्यता कमी आहे. कारण ही योजना मेडिक्लेम काढणाऱया एजन्सीचे खिसे भरण्यासाठी आहे, असे पडवळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

एखाद्या सरकारी किंवा निमसरकारी, दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णाचे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करायचे असेल तर 2017 च्या सरकारी दर पत्रकानुसार होते, परंतु ऑपरेशनसाठी लागणारी सामग्री कंपनीकडून मात्र आजच्या दराने घ्यावी लागते. म्हणजेच त्या रुग्णाला ऑपरेशनसाठी लागणाऱया अधिकच्या खर्चासाठी हॉस्पिटलमधून इस्टिमेट घेऊन ट्रस्टकडे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचा विचार करत 2017 च्या दरपत्रकात सुधारणा करत नवीन दरपत्रक आणावे, तरच सर्वसामान्य रुग्णांना योजनेचा लाभ होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;