संघाशी निगडित साप्ताहिकातून अजित पवार लक्ष्य, भाजपच्या खराब कामगिरीचं खापर त्यांच्या गटावर फोडलं

संघाशी निगडित साप्ताहिकातून अजित पवार लक्ष्य, भाजपच्या खराब कामगिरीचं खापर त्यांच्या गटावर फोडलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेल्या एक मराठी साप्ताहिक ‘विवेक’ने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीचं खापर अजित पवार यांच्या गटावर फोडलं आहे.

‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात’ या मथळ्याखाली ‘विवेक’मधील लेखात भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संवादाचा अभाव हे खराब कामगिरीमागील आणखी एक कारण आहे.

आरएसएसशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ या मासिकाने लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचीच लाट असल्याच्या अतिआत्मविश्वासात ग्राऊंड रियालिटीपासून भाजप नेते आणि कार्यकर्ते अनभिज्ञ राहिले, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षाची खरडपट्टी काढणारा लेख झळकला होता. त्यानंतर आता विवेक या साप्ताहिकातून पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली आहेय

विवेकच्या लेखानुसार अजित पवारांच्या गटाला भाजपने सोबत घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडे जनमत वळालं.

‘जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आपली नाराजी व्यक्त करताना आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशामागची कारणे सांगत असताना, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीपासून सुरुवात करतो. भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार गटाला सोबत घ्यायचे नव्हतं, हे यातून स्पष्ट होतं’, असं विवेकच्या लेखात म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा महायुतीला 48 पैकी अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. 2019 च्या तुलनेत विचार केला असता निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली.

2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी लढवलेल्या 28 जागांपैकी केवळ नऊ जागा जिंकण्यात यश मिळवलं. तर 13 जागा जिंकत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला.

‘अजित पवारांचा गट सोबत घेतल्यानंतर लोक भावना नंतर दुसऱ्या टोकाला जाऊ लागली. त्यानंतर, लोकसभेच्या निकालांनी नाराजी वाढवली, अर्थातच राजकीय नेत्यांची किंवा पक्षांची स्वतःची गणिते आणि पक्षपाती आहेत’, असंही यात म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांमधून नेता बनवणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचा दावाही लेखात करण्यात आला आहे, परंतु कार्यकर्त्यांना आता ही प्रक्रिया मोडीत निघाल्याचे जाणवत असल्याची खंतही यामधून व्यक्त करण्यात आली आहे.

विरोधी पक्षांनी भाजपवर केलेल्या ‘वॉशिंग मशीन’ चा उल्लेख करत, लेखात म्हटले आहे की, हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार करणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्यानंतर याला वाव मिळाला.

लोकसभा निवडणुकीपासून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांनी निकालांवर भाष्य केले आहे. गेल्या महिन्यात, निवडणुकीच्या निकालांवरील त्यांच्या पहिल्या टिप्पणीत, भागवत म्हणाले की खरा ‘सेवक’ अहंकारी नसतो आणि सन्मान राखून लोकांची सेवा करतो.

तसेच, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपच्या निकृष्ट कामगिरीचे श्रेय अहंकाराला दिले, ते म्हणाले की ‘अहंकारामुळेच प्रभू रामाने भाजपला 241 वर थांबवले’.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांच्या पिंपरी-चिंचवड विभागातील चार नेत्यांनी राजीनामा दिला आहे आणि ते लवकरच शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;