नगरच्यावेळी भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचं ऐकलं नाही? दादांनी खासगीत सांगितल्याची सूत्रांची माहिती

नगरच्यावेळी भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचं ऐकलं नाही? दादांनी खासगीत सांगितल्याची सूत्रांची माहिती

लोकसभा निकाल लागून दीड महिना लोटला आहे तरी लोकसभेच्या जागा आणि निकालांवरून अजूनही चर्चा सुरू आहेत. कारण देखील तसेच आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तगडा फटका बसला ज्यामुळे देशाच्या राजकारणाचा रंगच बदलला. या निकालानंतर महायुतीतील पक्ष एकमेकांना लक्ष्य करत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरच्या जागेसंदर्भात भाजपला निशाणा करत मोठा दावा केला आहे. यासंदर्भातील वृत्त मराठी वृत्तवाहिनीच्या संकेत स्थळानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

राज्यातील सरकार अस्थिर असल्याचं विरोधीपक्षाच्या नेत्यानं वारंवार म्हटलं आहे. तसेच अजित पवार गटातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात परत येणार असल्याची चर्चा आहे. अनेक जण तसा दावा राजकीय पक्षांकडून केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदारही परत शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याचा दावा शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोणीही कुठेही जाणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतरही सर्वच आमदारांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता, पुन्हा एकदा या आमदारांबाबत अजित पवारांनी खासगीत बोलताना ही प्रतिक्रिया दिल्याचं एबीपी माझाच्या वृत्तात म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातत्याने आमदार परत येणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही असा दावा करण्यात आला होता. आता, याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, असे अजित पवार यांनी खासगीत बोलल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

निलेश लंके यांच्यासंदर्भात मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ते जागा सोडू शकले नाहीत. ही जागा धोक्यात आहे, असंही मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. पण, भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही, असंही अजित पवारांनी म्हटल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;