अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, त्यांच्या जिवाला धोका – संजय सिंह

अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, त्यांच्या जिवाला धोका – संजय सिंह

आम आदमी पार्टीचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती एकदम ठीक असल्याचा दावा तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आपचे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषद त्यांचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. ”केजरीवाल यांना अटक झाल्यापासून त्यांच्या रक्तातील साखर पाच वेळी 50 च्या देखील खाली गेली आहे. अशाने ते कधीही कोमात जाऊ शकतात. यात त्यांचा जीवही जाऊ शकतो, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली. त्यावेळी त्यांचे वजन 70 किलो होते. मात्र तुरुंगातील काळात त्यांचे वजन साडे आठ किलोने कमी होऊन 61.5 किलोवर आले. वजन एवढे कसे कमी झाले याची गांभीर्याने तपासणीही होत नाही. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जास्तीत जास्त त्रास द्यायचा आणि त्यांच्या जीवाचा खेळ करायचा हेच भाजपचे उद्दिष्ट आहे, असा आरोप संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर सोमवारी तिहार तुरुंगातून हे आरोप फेटाळण्यात आले. तिहार तुरुंगाने अरविंद केजरीवाल यांना दररोज घरचा डब्बा दिला जातो व त्यांची प्रकृती उत्तम आहे असा दावा तिहार तुरंगाकडून करण्यात आला.

तिहार तुरुंगाचा हा दावा खोटा असल्याचे संजय सिंह म्हणाले आहेत. ”’अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांची रक्तातील साखर पाच वेळा पन्नासच्या खाली आली होती. एम्स रुग्णालयाचे एक वैद्यकीय पथक केजरीवाल यांची तपासणी करत असून त्यांच्या निदर्शनास आले आहे की त्यांचे वजन झपाट्याने कमी होत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होतेय. त्यामुळे ते कोमातही जाऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो, असे संजय सिंह म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;