50 वर्षांनी मिटला कोकणातल्या जमिनीचा वाद

50 वर्षांनी मिटला कोकणातल्या जमिनीचा वाद

कोकणातील जमिनीचा 50 वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहाराचा वाद अखेर उच्च न्यायालयात मिटला. या व्यवहारासाठी तयार केलेला पेपर म्हणजे विक्री की विक्रीचा करार हा मुद्दा न्यायालयाने निकाली काढला. हा पेपर म्हणजे जमिनीची विक्री झाली, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कणकवली येथील अनंत कांबळी यांनी भार्गव भोसले यांच्याकडून जमीन घेतली होती. 40 रुपयात हा व्यवहार झाला होता. 29 डिसेंबर 1973 रोजी या दोघांनी या व्यवहाराचा पेपर बनवला. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या. दीपक भार्गव भोसले व अन्य यांनी कणकवली नगर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. भार्गव यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचा गैरफायदा घेत कांबळी यांनी व्यवहाराचा पेपर बनवला. या जमिनीत कांबळी यांनी हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दिवाणी न्यायालयात करण्यात आली. दिवाणी न्यायालयाने भोसले यांचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात भोसले यांनी अपील दाखल केले. अपील न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निकाल फिरवला. त्याला कांबळी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;