मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न महत्त्वाचं आहे का? प्रसिद्ध गायिकेचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न महत्त्वाचं आहे का? प्रसिद्ध गायिकेचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट शनिवारी विवाहबद्ध झाले. या शाही लग्नसोहळ्याला राजकीय, क्रीडा, सिनेसृष्टीतील बड्या लोकांनी हजेरी लावली. तसेच देश-विदेशातील अनेक दिग्गजही दोघांना आशीर्वाद देण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबई दौऱ्यातून वेळात वेळ काढून या लग्नाला उपस्थिती दर्शवत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. यावरून प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोड हिने मोदींवर निशाणा साधला आहे.

नेहा सिंह राठोड हिने मणिपूरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेद्र मोदी यांना बोचरा सवाल केला आहे. मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न जास्त महत्त्वाचं आहे का? तुम्ही मणिपूरला का जात नाहीत? असे सवाल नेहा हिने मोदींना केले आहेत. यासोबत तिने मोदींचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात ते अंबानीच्या लग्ना अनंत व राधिया या जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.

मणिपूर गेल्या दीड वर्षापासून हिंसेच्या आगीत धुमसत आहे. दोन समाजात भडकलेल्या हिंसाचारात यातापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना पलायन करावे लागले आहे. मणिपूरमध्ये भाजपचेच सरकार असून गेल्या दीड वर्षात पंतप्रधानच नाही तर देशाचा एकही बडा नेता तिकडे फिरकलेलाही नाही. यावरून विरोधकांनीही त्यांच्यावर निशाणा साधला.

नुकतेच काँग्रेस खासदार आणि लोकसेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधींच्या या दौऱ्यावेळीही नेहा सिंह राठोड हिने मोदींवर हल्ला चढवला होता. देशाच्या लोकांना निराधार सोडून तुम्ही 18-18 तास काय करता? असा सवाल तिने केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;