पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, फांदी कोसळली; आपत्कालीन विभागात तक्रारींचा पाऊस

पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, फांदी कोसळली; आपत्कालीन विभागात तक्रारींचा पाऊस

मुंबईत दोन दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान तब्बल आठ हजार तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात नोंदवल्या गेल्या. यामध्ये पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, झाड-फांदी कोसळली, गटार तुंबले आदी प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या. आपत्कालीन विभागातील 1916 या टोल फ्री क्रमांकावर या तक्रारी आल्या. या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागाकडून करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवार, 8 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजल्यापासून  9 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 400 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. या अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले. भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी आदी भागांत पाण्याचा निचरा संथगतीने होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आपत्कालीन विभागाची महत्त्वपूर्ण बैठकही आज पार पडली. यावेळी पालिकेसह मुंबईतील विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी पाणी तुंबण्याची कारणे शोधून तातडीने उपायायोजना करा, असे निर्देश संबंधितांना दिले.

स्पॉट व्हिजिट करून कारणे शोधा

n अतिवृष्टीत कुर्ला, भांडुप आणि चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी स्पॉट व्हिजिट करून पाणी का तुंबले, याची कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले. n ज्या भागात पाण्याचा निचरा संथगतीने होत असल्याचे आढळून आले होते त्या भागांमध्ये अधिक पंप बसविणे किंवा अधिक क्षमतेचे पंप बसविणे यासारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच मुंबईतील रेल्वेसेवा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असेही निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;