रविवारी पाऊस ‘ऑनडय़ुटी’! घरीच थांबा; हवामान खात्याचा इशारा, मुंबईत तुफानी वाऱ्यासह मुसळधार

रविवारी पाऊस ‘ऑनडय़ुटी’! घरीच थांबा; हवामान खात्याचा इशारा, मुंबईत तुफानी वाऱ्यासह मुसळधार

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध जिह्यांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली. तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. नवी मुंबईत नाले तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आले तर ठाणे, पालघरमध्ये नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अकोल्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. उद्या विपेंडला रविवारीही पाऊस ऑनडय़ुटी असून तो अतिमुसळधार बरसणार असल्याने नागरिकांनी घरीच थांबावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई आणि उपनगरात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात तुफानी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे काही मार्गांवरील वाहतूक बंद पडली तर काही ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला. महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अंधेरी सब-वेमध्ये चार फूट पाणी साचले होते. अंधेरीसह सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीतील सखल भागांमध्येही पाणी साचले होते. झोपडपट्टय़ांमध्येही पाणी शिरले होते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलगाडय़ा अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने वाहनांना त्यातून मार्ग काढत कासवगतीने प्रवास करावा लागला.

ठाणे जिह्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसराला आज सकाळी पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी रात्रीपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये पाऊस थांबून थांबून कोसळला. आज सकाळपासूनही पावसाची संततधार सुरूच आहे. पालघर जिह्यात जोरदार पाऊस असल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तेथील सूर्या नदीला पूर आला आहे.

अकोल्यात दोघे बुडाले

अकोला जिह्यात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. जिह्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यांवर तरुणाईला पूर आला आहे. मात्र या आनंदाला आज गालबोट लागले. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील धोधाणी येथील धबधब्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

कोकणात मुसळधार

कोकणातही मुसळधार वर्षाव सुरू आहे. रायगड जिह्यातील अलिबागमध्ये जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी झाले होते. तेथील सर्जरी विभागात पाणी शिरल्याने त्याच परिस्थितीत रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना भाग पडले. दरड कोसळण्याची भीती असल्याने रायगडमधील महाड-भोर वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशच जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. वरंधा घाटातील वाघजाई मंदिराशेजारी असणाऱ्या वळणातील रस्ता खचल्याने वाहतुकीसह अडथळा येत होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;