अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल…’

अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘त्यांच्या चेहऱ्यांमध्ये झालेले बदल…’

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सामिल झाले होते. बिग बी यांनी नात नव्या नंदा आणि नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत पोज दिल्या. पण बच्चन कुटुंब ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत दिसलं नाही. आराध्या आणि ऐश्वर्या कुटुंबाशिवाय अंबानींच्या लग्नात सामिल झाल्या होत्या. लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांनी पहाटे 4 च्या दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अंबानींच्या लग्नाचा अनुभव शेअर करत बिग बी म्हणाले, ‘ या अलौकिक काळातही जोडण्याची इच्छा आणि इच्छा काहींसाठी… अनेकांसाठी ही कामाची वेळ आहे… परंतु माझ्यासाठी मला EF कनेक्टसाठी वेळ वापरावा लागेल. अनेक दिवसांनंतर अनेकांची झालेली भेट, प्रेम आणि स्नेह… ज्यामुळे जुन्या नात्यांचा पुन्हा विचार करू शकतो…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

‘असं वाटत आहे की, त्यांच्या चेहऱ्यांमध्ये आता बदल झाले आहेत. पण आमच्यात आसलेलं प्रेमळ नाते आजही खूप प्रामाणिक आहेत. यालाच जीवन असं म्हणतात. याच छोट्या – छोट्या गोष्टी एकमेकांसाठी फार महत्त्वाच्या असतात.’ असं देखील बिग बी म्हणाले. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, अंबानींच्या कोणत्याही कार्यक्रमात बच्चन कुटुंब मोठ्या आनंदाने हजेरी लावतात. अंबानी आणि बच्चन कुटुंबाचे नाते देखील फार खास आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी, मुलगी ईशा अंबानी यांच्या लग्नात देखील बच्चन कुटुंब उपस्थित होतं.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा होती.  दोघांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनसाठी देखील बच्चन कुटुंब जामनगर याठिकाणी पोहोचलं होतं. तेव्हा आराध्या हिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या सर्वत्र फक्त अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न आणि अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;