बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये पावसाचा कहर; वीज पडून 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये पावसाचा कहर; वीज पडून 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ घातला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आकाशातील वीज कहर बनून पडत असून आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकं जखमी झाले आहेत.

बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वीज पडून 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या नैसर्गिक घटनांवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशमधील 20 जिल्ह्यांमध्ये वीज पडून 43 लोकांचा मृत्यू झाला, तर काही लोकं जखमी झाले आहेत. सर्वाधिक मयत प्रतापगढ जिल्ह्यातील असून येथे वीज पडून 12 जणांचा मृत्यू झाला. तर सुल्तानपूर येथील 7, चंदोली येथील 6, मैनपुरी येथील 5 आणि प्रयागराज येथील 4 जणांचा यात समावेश आहे. यासह औरैया, देवरिया, हाथरस, वाराणसी आणि सिद्धार्थनगर येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला. प्रशासनाने सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार! मुंबईकरांची तारंबळ

झारखंडमध्येही मे-जून महिन्यात वीज पडून 32 जणांचा, तर जुलै महिन्यात 3 लोकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही विजेचा कहर सुरू असून येथे मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेच्या परिसरातील झाडावर वीज पडून 15 शाळकरी मुलं जखमी झाले.

एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, डोमकलमधील भागिरथपूर हायस्कूलमध्ये इमारतीच्या बाजूला असणाऱ्या झाडाजवळ मुलं उभी होती. त्याचवेळी आकाशातील वीज कोसळली आणि मुलं जखमी झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना मानसिक धक्का बसला असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;