मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार! मुंबईकरांची तारंबळ
जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाचं वर्णन म्हणजे मुसळधार अशा एकाच शब्दात करता येतं. शुक्रवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात अशाच जलधारा कोसळू लागल्या आहेत. यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर इतका आहे की छत्री, रेनकोट असूनही अक्षरश: लोक भिजून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी असाच पाऊस कोसळत असल्यानं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. शाळा – महाविद्यालयांनी वेळेवर सुट्टी जाहीर केली तर काही शाळांनी ऑनलाइन वर्ग घेतले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List