विधानसभेला महाविकास आघाडी 225 जागा जिंकणार! शरद पवार यांचा विश्वास

विधानसभेला महाविकास आघाडी 225 जागा जिंकणार! शरद पवार यांचा विश्वास

तुम्ही मते मागायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱया रस्त्याने जाता हे वागणे शहाणपणाचे नाही. ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय.

महाराष्ट्र सध्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे. हे चित्र बदलवण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. आता लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 225 पेक्षा जास्त जागा जिंकून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

लातूर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. महायुतीचे पानिपत होईल याचा स्वप्नातसुद्धा कोणी विचार केला नसेल; पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारडय़ात मते टाकून शिंदे-फडणवीस-अजित पवार या त्रिमूर्तीला जोरदार झटका दिला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 जागा जिंकेल असे चित्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काम करणे ही तुमची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

ज्यांना मान दिला त्यांनी घात केला
उदगीर आणि देवळाली या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते; मात्र त्यांनी मतदारांचा घात केला. तुम्ही मते मागायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱया रस्त्याने जाता हे वागणे शहाणपणाचे नाही. ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला.

विलासरावांची झाली आठवण
खासदार सुप्रिया सुळे यांनी विलासराव देशमुख यांची आठवण काढली. त्यांनी मुख्यमंत्री असताना आघाडीचा धर्म पाळल्याची आठवण त्यांनी काढली. लातूर हा महत्त्वाचा जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या. सुधाकर भालेराव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी माणसाला गद्दारी आवडत नाही – जयंत पाटील
मराठी माणसाला सर्व गोष्टी सहन होतात. पण फसवलेले सहन होत नाही. तुम्ही कोणाला फसवले, त्यानंतर तुम्ही त्या माणसावर सोन्याच्या नोटांचा वर्षाव केला तरी मराठी माणूस बघत नाही. कारण मराठी माणसाला गद्दारी केलेली कधीही आवडत नाही. गद्दारीचा नामशेष करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर विश्वासाने दिलेली आहे. तुम्ही विजय खेचून आणाल आणि गद्दारांना धडा शिकवाल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;