काँग्रेसचा स्मार्ट मीटर, वीज दरवाढीचा मोर्चा अडवला, नेत्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले

काँग्रेसचा स्मार्ट मीटर, वीज दरवाढीचा मोर्चा अडवला, नेत्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले

स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढविरोधात मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि काँग्रेसच्या नेत्यांना बीकेसी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले तर मोर्चात येणाऱया बसेस व वाहनेही अडवली. मोर्चाला परवानगी नाकारून भाजप सरकारने अदानीला संरक्षण दिले, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेसने राज्य सरकार आणि अदानी पंपनीविरोधात आंदोलन केले. घरगुती वीजदरात वाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील जनक्षोभ रोखण्यासाठी सरकारने पोलिसांना पुढे करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारला गोरगरीबांच्या दुःखाचे काही सोयरसुतक नाही. कारण हे सरकार मूठभर धनदांडग्यांसाठीच काम करते, असा संताप काँग्रेसने व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;