Farmers Protest : मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन; MSP, कर्जमाफीसाठी SKM करणार हल्लाबोल

Farmers Protest : मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन; MSP, कर्जमाफीसाठी SKM करणार हल्लाबोल

संयुक्त किसान मोर्चाने 2020-21 मध्ये शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तीन वर्षांनंतर आता पुन्हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरून संयुक्त किसान मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. यात बैठकीला 17 राज्यांमधील 150 प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकरी पेन्शन, एमएसपी आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तीन काळ्या कायद्यांच्या माध्यमातून सरकारला हुकूमशाही चालवायची आहे, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले.

शेतकरी हितासाठी आंदोलन पुन्हा छेडण्यात यणार आहे. आंदोलनापूर्वी राज्यांमधील संघटना बळकट केल्या जातील. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे एक पत्र तयार केले जाईल. हे पत्र देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रसारित केले जाईल. ऑल इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा उठवण्यात येईल. सरकारने शेतकऱ्यांशी खोटारडेपणा केला आहे, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांशी चर्चा न करताच एमएसपीच्या खोट्या प्रस्तावाचा उल्लेख केला आणि जुनीच एमएसपी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आता लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांसाठी एक अपडेटेड मागणी पत्र सादर करण्याची योजना आखली आहे. 16 ते 18 जुलैदरम्यान संयुक्त किसान मोर्चाकडून राज्यांमधील प्रतिनिधींचे मंडळ वैयक्तीकरित्या खासदारांची भेट घेतील. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केंद्रातील मोदी सरकावर दबाव आणावा, अशी मागणी या भेटीत खासदारांकडे केली जाईल.

पुढील तीन-चार महिने शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे नेले जाईल. 9 ऑगस्टला कॉर्पोरेट भारत छोडो आंदोलन केले जाईल. शेतकरी आंदोलनाचा फोकस हा निवडणूक होणाऱ्या चार राज्यांवर असेल. आपले म्हणणं पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ‘बीजेपी को बेनकाब करो’ हे आंदोलन छेडले जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;