‘आई कुठे काय करते’ मालिकेत रंजक ट्विस्ट; सुरू होणार नवा अध्याय
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा सुरू होणार आहे. अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे. अरुंधतीला या स्पर्धेत मिहीर शर्मा साथ देणार आहे.
अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनानेदेखील कंबर कसली आहे. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार हे मात्र नक्की. अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे.
या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे. अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List