आभाळमारा! पावसाचे तुफान, समुद्राला उधाण! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला धोका

आभाळमारा! पावसाचे तुफान, समुद्राला उधाण! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला धोका

मुंबईसह कोकणावर गेल्या 24 तासांपासून पावसाचा तुफान आभाळमारा सुरू आहे. कोकणातील नद्यांना पूर आला असून अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. आतापर्यंत शेकडो रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले असून वाडीवस्त्यांमधून होडय़ा चालवण्याची आफत ओढवली आहे. रस्ते तुटल्याने, पाण्याखाली गेल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक भागांचा संपर्प तुटला आहे. कालपासून वीजही गायब आहे. कुडाळ तालुक्यात अत्यंत भीषण स्थिती असून पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर शिरल्याने 14 तास वाहतूक ठप्प होती. या भागात एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, समुद्राला उधाण आले असून पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अॅलर्ट तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिह्यांत काही भागात अतिमुसळधार पावसाचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

24 तास राहा सतर्क…

मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला आहे. त्याच वेळी पावसाचा जोरही वाढत असल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संपूर्ण कोकणासाठी पुढचे 24 तास धोक्याचे असणार आहेत. किनाऱयांवर पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. किनाऱयाकडे येणाऱया पर्यटकांना माघारी धाडले जात आहे. त्याच वेळी लाऊडस्पीकरवरून धोक्याची सूचना देण्यात येत आहे. मच्छीमारांनाही सतर्प केले गेले आहे.

रेकॉर्डब्रेक पाऊस

रत्नागिरी जिह्यात गेल्या 24 तासांत 205 मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे जिह्यातील अनेक भागांत पूरस्थिती आहे. सिंधुदुर्गातही भीषण स्थिती आहे. एकटय़ा सावंतवाडी तालुक्यात 24 तासांत तब्बल 270 मिमी पाऊस झाला. देवगडमध्ये 261 मिमी, मालवणमध्ये 220 मिमी तर पुडाळमध्ये 215 मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे नद्यांना पूर येऊन पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे.

अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन उद्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लोक अडकले, एनडीआरएफची टीम दाखल

कुडाळ भंगसाळ (कर्ली), पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे हातेरी, हुमरमळा पीठढवळ व माणगाव निर्मला नदी या नद्यांना पूर आला आहे.

कुडाळ कविलकाटे, काळपनाका, लक्ष्मीवाडी, पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, अणाव, वाडी हुमरमळा, बाव, बांबुळी, सरंबळ, चेंदवण, पिंगुळी, बिबवणे, मांडपुली, मुळदे, आंबडपाल या नदीकाठच्या भागातील दीडशे घरांना पाण्याचा वेढा पडला.

घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या भागात प्रथम नागरिकांनीच बचावकार्य केले. सर्वांनाच रविवारची रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, ओरोस व पावशी येथे एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून पावशी शेलटेवाडी व अन्य भागातील नागरिकांना या पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;