मनमाड, नाशिक रोडला प्रवाशांचे हाल
कसारा घाटात काल पावसामुळे माती खचल्याने, तर आज मुंबईतील मुसळधार पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याचे चित्र होते. परिणामी, काही गाडय़ा मनमाड ते इगतपुरीच धावल्या, लांब पल्ल्याच्या गाडय़ा 3 ते 9 तास विलंबाने येत असल्याने मनमाड, नाशिकरोड स्थानकावर प्रवाशी खोळंबले होते.
पंचवटी, जनशताब्दी, गोदावरी एक्प्रेस आज इगतपुरीपर्यंत पोहोचल्यानंतर रद्द करण्यात आल्या. नोकरीसाठी मुंबईला जाणाऱया जिल्हावासियांचे प्रचंड हाल झाले. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. रिवा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्प्रेस 9 तास उशिराने धावत होती. बरेली एक्प्रेस आठ तासांनी, गोरखपूर एक्प्रेस सहा तासांनी येणार असल्याने प्रवाशी ताटकळत होते. मुंबईहून येणाऱया आणि जाणाऱया सर्व गाडय़ा तीन ते नऊ तास विलंबाने धावत असल्याने शेकडो प्रवाशी मनमाड, नाशिकरोड स्थानकात थांबून होते. कोणार्क एक्प्रेस, दुरांतो, नंदीग्राम, पाटलीपुत्र, कोलकता, गरीबरथ, कोईंबतूर, कृषीनगर, विदर्भ एक्प्रेससह नाशिकरोडमार्गे जाणाऱ्या पंधरा गाडय़ा दीड ते नऊ तास विलंबाने पोहोचत होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List