महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, फक्त ओरबडण्याचे काम सुरू आहे, अंबादास दानवे यांची टीका

महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, फक्त ओरबडण्याचे काम सुरू आहे, अंबादास दानवे यांची टीका

”मुंबई पाऊस पडतो हे काही नवीन नाही. अद्याप एवढा पाऊस देखील पडलेला नाही. असं असतानाही संपूर्ण मुंबई भरली आहे. महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, त्यामुळे मुंबई तुंबली”, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 7 या सहा तासात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे जागोजागी सखल भागात पाणी साचले. रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचल्याने रेल्वे सेवा बरेच तास ठप्प होती. त्यामुळे ऑफिसला निघालेल्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले.

यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ”तसा पाहायला गेलं तर अजुनही जोरदार पाऊस झालेला नाही. असं असताना ठिकठिकाणी पाणी भरलंय. महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, त्यामुळे मुंबई तुंबली आहे. मुंबईत पाऊस येणं हे अचानक झालेलं नाही. हे सगळं माहित असतानाही पावसाळी कामे झालेले नाहीत हे यावरून स्पष्ट होतंय. आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना याचे व्यवस्थित नियोजन झाले होते. मात्र आता फक्त मुंबई ओरबडण्याचे काम सुरू आहे”, अशी टीका अंबादाास दानवे यांनी केली.

दानवे यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरूनही मिंधे सरकारला फटकारले आहे. ”पुण्यात जशी घटना घडली तशीच घटना मुंबईत घडली आहे. जे आमच्यातून गेलेले गद्दार लोकं आहेत त्यांचे उपनेते राजेश शहा यांच्या मुलाच्या वाहनाने हा अपघात घडवला आहे. अद्याप हा आरोपी मुलगा फरार आहे. सत्ताधारी नेत्याचा मुलगा सर्व सामान्य कुटुंबातील महिलेला धडक देतो व फरफटत नेतो. धडकेनंतर थांबण्याऐवजी तिला फरफटत नेले. जर तो थांबला असता तर तिचा जीव वाचला असता. महाराष्ट्रात सर्वसामन्याचा जीव किती सहज घेता येतो हे कालच्या घटनेवरून दिसून येतेय. सरकार यात बिलकूल गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांच्या हातात एवढी मोठी यंत्रणा आहे. तुम्ही भल्या भल्या विकेट घेता असं म्हणता पण जर आपल्या नेत्याला व त्याच्या मुलाला वाचवत असाल तर हा अपराध होईल, अशा इशारा दानवे यांनी मुख्यमंत्र्‍यांना दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;