Mumbai Rain update : मध्य रेल्वेची धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतूक सुरू, हार्बर मार्ग बंदच
मुंबईत रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून पहाटेपासून ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. मात्र आता ही वाहतूक धीम्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. अद्याप जलद मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. धीम्या मार्गावरील लोकल देखील अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. तसेच चुनाभट्टी स्थानकावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने या हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे सेवा बंद पडली होती. मात्र आता रेल्वे ट्रॅकवरील पाणी कमी झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक आता धीम्या गतीने सुरू झाली आहे. #centralrailway #MumbaiRain #HeavyRain #rainalert pic.twitter.com/rKuUtmX9Eb
— Saamana (@SaamanaOnline) July 8, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List