विजय यात्रेपूर्वीच चाहत्यांच्या गर्दीत अडकला टीम इंडियाचा विजयरथ
टीम इंडियाच्या विजय परेडसाठी वापरण्यात येणारा विजय रथ (Open-Top-Bus) मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. त्यामुळे परेड सुरू होण्यास उशीर होणार आहे.
T20 वर्ल्डकप घेऊन टीम इंडिया गुरूवारी सकाळी हिंदुस्थानात परतली. खेळाडूंच्या स्वागताकरीता दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. यानंतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेळाडू मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नरीमन पाँईट ते वानखेडे स्टेडियम येथे खुल्या बसमधून विजययात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर टीम इंडियाचा बीसीसीआयच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List