‘ठरलं तर मग’ मालिकेत सर्वांत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांसाठी अत्यंत हळवा क्षण
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच अग्रस्थानी असते. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात.
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पहातोय, तो भावनिक क्षण येत्या 8 जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारणार आहे. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे.
खरंतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सायलीच्या निरागस स्वभावाच्या प्रेमात अर्जुनही पडला. पूर्णाआजीचं मतपरिवर्तन व्हायला मात्र खूप वाट पहावी लागली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List