15 जुलैपर्यंत ‘लगीनघाई, नंतर नोव्हेंबरमध्ये विवाह मुहूर्त
सात महिने बॅण्ड, शहनाई वाजली. आता 15 जुलैपर्यंत मुहूर्त असून ठरलेली लग्नकार्ये 15 जुलैच्या आत उरकावी लागणार आहेत. त्यानंतर ‘सावधान’ चार महिन्यांसाठी बंद होणार आहे. आषाढी एकादशीला लग्नकार्ये थांबणार असून कार्तिकी एकादशीपर्यंत मुहूर्त राहत नाहीत. म्हणजे लगीनघाई 15 जुलैनंतर नोव्हेंबरमध्येच सुरू होईल. या वर्षी मे महिन्यात गुरूचा अस्त होता. त्यामुळे महिनाभर लग्नकार्ये थांबली. आता पुढे फक्त आठ लग्न मुहूर्त शिल्लक असून वर्षभरात 61 लग्न मुहूर्त होते. जुलै महिन्यात 9, 11, 12, 13, 14 आणि 15 जुलै या दिवशी मुहूर्त आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List