आरबीआयकडून अलर्ट जारी; बँक खात्यावर सायबर हल्ल्याचा धोका
देशातील कोटय़वधी बँक खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे. हिंदुस्थानींच्या बँक खात्यांवर सध्या सायबर हल्ला होण्याची टांगती तलवार आहे, असे सांगत यासंबंधीचा अलर्ट भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. सेंट्रल बँकेने बँक खात्यावर सायबर अटॅकचा धोका ओळखून सर्व बँकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना केल्या असून 24 तास अलर्ट राहा, असे म्हटले आहे. बँकांवर सायबर अटॅक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सेंट्रल बँकेने सर्व बँका व आर्थिक संस्थांना 24 जून रोजी एक पत्र पाठवून अलर्ट दिला आहे. सर्विलान्सची क्षमता वाढवा आणि उर्वरित उपायसुद्धा वापरा, असे बँकांना सांगण्यात आले आहे. याआधीही सीईआरटी-इनने गेल्या वर्षी यासारख्या धोक्याची सूचना जारी केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List