आमदार, खासदारांची कोर्टवारी लवकरच थांबणार, डिसेंबर 2019 पूर्वीचे राजकीय आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार

आमदार, खासदारांची कोर्टवारी लवकरच थांबणार, डिसेंबर 2019 पूर्वीचे राजकीय आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार

राज्यातील आजी-माजी आमदार, खासदारांविरोधात डिसेंबर 2019पूर्वी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंबंधी उच्च न्यायालयाने अनुकूल भूमिका घेतली आहे. संपूर्ण राज्यभरात आजी-माजी आमदार, खासदारांविरोधात प्रलंबित असलेल्या राजकीय खटल्यांचा तपशील चार आठवडय़ांत सादर करा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या विशेष खंडपीठाने शुक्रवारी प्रधान जिल्हा न्यायाधीशांना दिले.

राजकीय आंदोलनाच्या गुह्यांसंदर्भात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अॅड. विनोद उत्तेकर यांच्यामार्फत रिट याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सर्व आजी-माजी आमदार, खासदारांविरोधातील राजकीय गुह्यांची दखल घेतली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून विशेष खंडपीठ नेमण्यात आले. याबाबत शुक्रवारी सुमोटो याचिकेसह इतर रिट याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या विशेष खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी सरकारी वकिलांनी राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयात मोठय़ा प्रमाणावर राजकीय आंदोलनाचे खटले प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यांच्या युक्तिवादाची खंडपीठाने नोंद घेतली आणि राज्यभरात आजी-माजी आमदार, खासदारांविरोधात 31 डिसेंबर 2019पूर्वी दाखल केलेले राजकीय गुन्हे व त्या गुह्यांच्या प्रलंबित खटल्यांचा तपशील सादर करण्याचे निर्देश प्रधान जिल्हा न्यायाधीशांना दिले. तसेच शासन निर्णयाला अनुसरून राजकीय गुन्हे मागे घेण्यासंबंधी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला दिले. 2 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

खटले जलदगतीने चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

– आजी-माजी आमदार, खासदारांविरोधातील खटल्यांचा जलदगतीने निपटारा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याबाबत राज्य सरकारने व्यापक जनहिताचा विचार करून फौजदारी दंड संहितेच्या कलम 321 अंतर्गत अधिकाराचा वापर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचविले होते.

-लोकप्रतिनिधींविरोधातील राजकीय व सामाजिक गुन्हे मागे घेण्यासंबंधी राज्य सरकारने 14 मार्च 2016 आणि 16 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णय (जीआर) जारी करून धोरणात्मक निर्णय घेतला. त्याद्वारे सरकारने समिती स्थापन केली आहे. त्यानुसार गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारी पक्षाला परवानगी देण्यापूर्वी न्यायालयाला संबंधित अर्ज व्यापक जनहिताला धरून आहेत का, याची खातरजमा करावी लागणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;