Ratnagiri News : जिल्ह्यात डेंग्युने डोके वर काढले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 143 डेंग्युचे रुग्ण सापडले आहेत. डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेने डास प्रतिबंधक फवारणीला सुरुवात केली आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसेंदिवस डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात 127 डेंग्युचे रुग्ण उपचार घेत आहेत, तर नव्याने 143 रुग्ण सापडले आहेत. डेंग्युच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेकडून शहरात डास निर्मुलनासाठी फवारणी करण्यात येत आहे. डेंग्युबाबत जनजागृती करणारे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. तसेच 28 आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन डेंग्युच्या आजाराबाबत जनजागृती करणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List