BEST ची दरवाढ नाही, हा आहे आपला IMPACT!; आदित्य ठाकरे यांचा BMC ला दणका
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मंगळवारी पत्र लिहिले होते. या पत्रानंतर मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासन ताळ्यावर आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच ‘हा आहे आपला IMPACT!’ असे म्हणत मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला टोला लगावला आहे.
अनेक वर्ष बेस्ट ही ‘सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त सेवा’ अशी ओळख असणारी सेवा होती. मिंधे भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरु आहे. त्यातच अजून एक म्हणजे ‘बेस्ट’ कमजोर करून, अर्थसहाय्य बंद करणे, दरवाढ करणे.
मी पत्र देताच ‘बेस्ट’ ने आता दरवाढ नाही करणार असे सांगितले… pic.twitter.com/6fJeGLtTR0— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 26, 2024
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी बेस्ट बससेवा दरवाढीच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. ‘अनेक वर्ष बेस्ट ही ‘सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त सेवा’ अशी ओळख असणारी सेवा होती. मिंधे भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातच अजून एक म्हणजे ‘बेस्ट’ कमजोर करून, अर्थसहाय्य बंद करणे, दरवाढ करणे. मी पत्र देताच ‘बेस्ट’ ने आता दरवाढ नाही करणार असे सांगितले आहे. हा आहे आपला IMPACT!’ असे आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List