मणिपूर, शेतकरी, बेरोजगार यांना सरकार न्याय देऊ शकत नाही तेव्हा वाईट वाटते; अरविंद सावंत यांचे संसदेत जबरदस्त भाषण

मणिपूर, शेतकरी, बेरोजगार यांना सरकार न्याय देऊ शकत नाही तेव्हा वाईट वाटते; अरविंद सावंत यांचे संसदेत जबरदस्त भाषण

लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बुधवारी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करणारे भाषण केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खासदार अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. सावंत यांनी जबरदस्त भाषण करत सत्ताधारी पक्षावर आसूड ओढले. ‘मणिपूर, शेतकरी, बेरोजगार यांना सरकार न्याय देऊ शकत नाही तेव्हा वाईट वाटते”, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी पक्षांना लगावला.

”आपण दिलेल्या शब्दात जान आणि शान दोन्ही असायला हवी. दिलेली वचनपूर्ती पूर्ण व्हायला पाहिजे. संकट काळात सरकारकडून मदत मिळत नाही तेव्हा खूप वाईट वाटतं. स्वातंत्र समानता हे सगळं संविधानात दिलं आहे. आम्ही फक्त एक अपेक्षा करतोय. आम्हाला फक्त एकता हवी आहे द्वेष नकोय. आपण ज्या भिंती उभ्या करताय त्या तुटायला हव्यात. मणिपूरची घटना घडते तेव्हा एक अश्रूही येत नाही तेव्हा वाईट वाटतं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांचे इतके मोठे आंदोलन झाले तेव्हा साध्या संवेदनाही व्यक्त होत नाही, तेव्हा वाईट वाटतं. बेरोजगार रस्त्यावर फिरतोय़ त्याला सरकार न्याय देऊ शकत त्यावेळी वाईट वाटतं. या वेळी या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन सदन चालायला हवे”, असे अरविंद सावंत म्हणाले.

”ओम बिर्लाजी आपण न्याय‍धीशासारख्या पदावर विराजमान झाले आहात. गेल्या वेळी तुम्ही अध्यक्ष असताना काही कायदे पास केले गेले. त्यात एक इलेक्शन कमिश्नरचा कायदा होता तो आम्हाला निलंबीत केलेले बनवला गेला. न्याय द्यायची प्रक्रीया जिथे होते, कायदा बनवणारे आपण आहोत. तेच कायदे बदलले जातात तेव्हाच संविधानाची गोष्ट येते. संविधानाच्या सुरक्षेसाठी इंडिया आघाडी बनली आहे. हे सदन चालायला हवे यात काही दुमत नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावे यासाठी हे सदन चालायला हवे. त्यामुळे आमचा आवाज तुमच्याकडे आल्यावर तुम्ही आम्हाला अनुमती द्याल. संविधानाची रक्षा करण्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल, असे आवाहन अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;