अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाकडून रद्द
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने रद्द केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देताना विवेकाचा वापर केलेला नाही, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या पीठाने राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे.
न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाच्या पीठाने केजरीवाल यांना जामीन देताना आपल्या विवेकाचा वापर केला नाही, असे निरीक्षणही नोंदवले आहे. आम्ही दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. मात्र कनिष्ठ न्यायालयाने ईडीच्या कागदपत्रांची दखल घेतलेली नाही. कनिष्ठ न्यायालयाने पीएमएलएच्या कलम 45 मधील दुहेरी अटींवरही लक्ष दिले नाही, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.
याआधी कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता. या जामिनाला दिल्ली हायकोर्टाने 25 जूनपर्यंत स्थगिती दिली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या सुनावणीवेळी हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा केजरीवाल यांना जामीन देण्याचा निर्णय रद्द केला आहे. केडरीवाल यांना प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर 2 मे रोजी केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List