मणिपूर धगधगतेच; खोऱ्यातील जिल्ह्यांत सुरक्षा तैनातीविरुद्ध जनक्षोभ

मणिपूर धगधगतेच; खोऱ्यातील जिल्ह्यांत सुरक्षा तैनातीविरुद्ध जनक्षोभ

मैतेई आणि कुकीं समाजातील हिंसाचार अद्याप थांबलेला नसून मणिपूर अजूनही धगधगतेच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात सुरक्षा दलांचा प्रचंड फौजफाटा तैनात केला आहे. संवेदनशील भागांबरोबरच खोऱ्यातील जिल्ह्यांतही केंद्रीय सुरक्षा दलांचे मोठ्या प्रमाणावर जवान तैनात केले आहेत. या जवानांनी जिल्ह्यांच्या सीमेवरील वस्त्यांचे रक्षण करणाऱ्या स्वयंसेवकांना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. त्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. रविवारी संतप्त नागरिकांनी खोऱ्यातील सुरक्षा तैनातीविरुद्ध तीव्र निदर्शने केली.

अमित शहांनी घेतला सुरक्षा परिस्थितीचा आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. त्या बैठकीत संघर्षग्रस्त मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर काही दिवसांतच खोऱ्यातील जिल्ह्यांतील सुरक्षा तैनातीविरुद्ध नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्यावर रविवारी विविध जिल्ह्यांतील नागरिक एकत्रित आले आणि ठिकठिकाणी सामूहिक निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक निदर्शने

‘इमागी मीरा ओटगानिस’ नावाच्या संघटनेच्या संयोजिका सुजाता देवी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. सरकारने केंद्रीय निमलष्करी दलांना दूरवर आणि संवेदनशील भागात तैनात केले पाहिजे. त्याऐवजी प्रामुख्याने खोऱ्यातील जिल्ह्यांत सुरक्षा दलांच्या जवानांना तैनात करून स्थानिकांना निष्कारण वेठीस धरले जात आहे. यावर आमचा विरोध आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला मणिपूरच्या परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधायचे असल्याने सामूहिक निदर्शने करीत आहोत, अशी प्रतिक्रिया सुजाता देवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

वर्षभरापासून सुरु आहे जातीय हिंसाचार

राज्यात गेल्या वर्षी ३ मेपासून जातीय हिंसाचार उसळला आहे. बहुसंख्यांक असलेल्या मैतेई समुदायाने अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्यासाठी जोर लावला आहे. मैतेई समुदायाच्या या मागणीला राज्याच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चाने विरोध केला आहे. सतत सुरु असलेल्या हिंसाचारात कुकी व मैतेई या दोन्ही समुदायांचे २२० हून अधिक लोक तसेच सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत. हा हिंसाचार थांबवण्यात केंद्रातील मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;