लोकसभेत इंडिया आघाडीचे 240 चे 275 कधी होतील हे सरकारला कळणार ही नाही – संजय राऊत
इंडिया आघाडीचे 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील तेव्हा मोदी शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की विरोधी पक्ष काय असतोत्या 240 चे 275 कधी होतील हे मोदी शहा यांना कळणार ही नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी शहांना दिला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप व मिंधे गटावर टीका केली.
सोमवार पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे एकत्र संसदेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. ”आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. हे सर्व 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील व प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आहोत हा संदेश घेऊन हे खासदार संसदेत प्रवेश करतील. त्यावेळी मोदी शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की विरोधी पक्ष काय असतो. गेल्या दहा वर्षात ज्या विरोधी पक्षाला चिरडण्याचा द़डपण्याचा प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेत येणार आहे. आता संसदेत विरोधी पक्षातील 240 खासदारांचा आवाज घुमणार . मोदी व शहा समोर प्रथमच एक विरोधी पक्ष नेता असेल. आमच्या 240 चे 275 कधी होतील हे त्यांना कळणार ही नाही, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List