T20 World Cup 2024 : हार्दिकने चोपले, कुलदीपने गुंडाळले; बांग्लादेशला नमवत टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक
टीम इंडियाचा विजयरथ सुसाट असून अफगाणिस्तानला पाणी पाजल्यावर बांग्लादेशचा सुद्धा टीम इंडियाने सुपडा साफ केला आहे. सुपर 8 मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने (27 चेंडू 50 धावा) केलेल्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाने बांग्लादेशला 197 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कुलदीपच्या जादूई फिरकीच्या जाळ्यात बांग्लादेशी फलंदाज अडकले आणि 50 धावांनी त्यांचा परभाव झाला. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमी फायनलचे तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.
WT20 2024. India Won by 50 Run(s) https://t.co/UDl6GDmecg #T20WorldCup #INDvBAN
— BCCI (@BCCI) June 22, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List