आसाममधील पुराचा दोन लाख नागरिकांना फटका

आसाममधील पुराचा दोन लाख नागरिकांना फटका

पूर आल्यामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचा फटका तब्बल दोन लाख नागरिकांना बसला आहे. या पुरात आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे आसामला पुराचा विळखा बसला असून शुक्रवारी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिह्यांतील लोक पूरस्थितीचा सामना करीत आहेत. कोपिली, बराक, कुशियारा सह अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. आसाममधील 19 जिह्यांतील लोक पूरग्रस्त भागात जीव मुठीत घेऊन राहात आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, कछार, दरांग, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, करीमगंज, कोकराझार, लखीमपुर, नागाव, नलबाडी, सोनितपूर, दक्षिण सालमारा, तामूलपूर, उदलगुरी या जिह्यांचा यात समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;