खोपोलीजवळ रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाले

खोपोलीजवळ रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाले

वर्षा सहलीची धमालमस्ती चार तरुणांच्या जीवावर बेतली आहे. खोपोली-चौक मार्गावरील पोखरवाडी येथील तलावात बुडून वांद्रय़ाच्या रिझवी कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एकलव्य सिंह, इशांत यादव, आकाश माने, रनोत बंदा अशी मृतांची नावे आहेत.

एका संस्थेच्या वतीने खोपोली-चौक मार्गावर आणि माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखरवाडीत वर्षा सहल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुंबईच्या विविध भागांतील 37 तरुण, तरुणी एकत्र लक्झरी बसने आले होते. त्यात 17 मुलींचा समावेश होता.

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सगळे पोखर तलावात पोहण्यास उतरले. त्यात एकलव्य सिंह, इशांत यादव, आकाश माने, रनोत बंदा हे रिझवी कॉलेजचे चार तरुण तलावाच्या मध्यभागी असलेल्या भोवऱयात अडकले. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे चारही विद्यार्थी 17 ते 23 वयोगटातील आहेत. चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने रिझवी कॉलेजवर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;