देशाच्या विकासाचा पाया काँग्रेसने रचला, गौतम अदानी यांनी केली स्तुती

देशाच्या विकासाचा पाया काँग्रेसने रचला, गौतम अदानी यांनी केली स्तुती

अदानी ग्रृपचे चेयरमन गौतम अडाणी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक धोरणांची स्तुती केली आहे. अचानक गौतम अदानी यांनी केलेल्या काँग्रेसच्या स्तुतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पीव्ही नरसिंहा राव व मनमोहन सिंह अर्थ मंत्री असताना देशाच्या आर्थिर विकासाचा पाया रचला गेला, असे अदानी म्हणाले.

”1991 ते 2014 चा काळ हा देशाच्या विकासाचा भक्कम पाया तयार करणे व योग्य रनवे निर्माण करण्याचा होता तर 2014 ते 2024 हा काळ देशाच्या विकासाच्या टेकऑफचा होता. माजी पंतप्रधान पीवी नरसिंहा राव व त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी आणलेली आर्थिक सुधारणा ही देशाच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. 1991 मध्ये काँग्रेसच्या सरकारने जागतिकीकरणाच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांची मालिका सुरू केली. 1991 हे देशाच्या आर्थिक सुधारणेसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले”, असे गौतम अदानी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;