मुंबईकरांना दिलासा; तूर्तास आणखी पाणीकपात नाही

मुंबईकरांना दिलासा; तूर्तास आणखी पाणीकपात नाही

मुंबईत पावसाचे वेळेवर आगमन झाले, मात्र एकदोन आठवडे तो तरी तो बरसलाच नाही. त्यामुळे आधीच 10 टक्के पाणीकपात असलेल्या मुंबईची चिंता वाढली आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमध्ये आता केवळ 5.32 शिल्लक राहिला आहे. मात्र जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे तूर्तास आणखी पाणीकपात केली जाणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली 

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 43 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते, मात्र धरणांतील पाणीसाठय़ात घट झाल्याने 5 जूनपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. रोज पाणीपुरवठा होतो त्यापैकी 10 टक्के पाण्याची बचत होत असल्याने रोज 400 दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने राज्य सरकारने दोन लाख 28 हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला असून तो वापरण्यास सुरुवात केली आहे. तरीही जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा उरणार आहे.

भातसाने तळ गाठला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांपैकी भातसा धरणाची क्षमता 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटरची असून मुंबईला  सर्वाधिक पाणीपुरवठा भातसातून केला जातो, मात्र यंदा भातसा धरणाने तळ गाठला असून पाण्याची पातळी शून्यावर आली आहे.

20 जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

n भातसा ……………………  0

n अप्पर वैतरणा …………..  0

n मोडक सागर ……  19,657

n तानसा ……………  31,049

n मध्य वैतरणा …..  19,386

n विहार ………………  5,035

n तुळशी ………………  1,925

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;