बंगालच्या राज्यपालांना वाटते पोलिसांचीच भिती; राजभवनात सुरक्षित वाटत नसल्याची दिली माहिती
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी आज सांगितलं की, कोलकाता येथील राजभवनात तैनात असलेल्या कोलकाता पोलिसांच्या सध्याच्या तुकडीमुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राजभवन परिसर रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, ते अद्यापही गव्हर्नर हाऊसमध्ये कार्यरत आहेत.
राज्यपाल बोस यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितले, ‘सध्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या टीमची उपस्थिती माझ्या वैयक्तिक सुरक्षेला धोका आहे यावर विश्वास ठेवण्याची कारणे आहेत’.
ते म्हणाले, ‘मी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजभवनात कोलकाता पोलिसांसोबत असुरक्षित असल्याची माहिती दिली आहे, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही’, असं ते म्हणाले.
गव्हर्नर हाऊसमधील सूत्रांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितलं की, राज्यपाल बोस यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली आहे की राजभवनात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून सतत लुबाडणूक केली जात आहे आणि ते ‘कुणाच्या’ सांगण्यावरून हे करत असल्याचे त्यांना समजू शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List