दोन–तीन नव्हे, चार मुले हवीत!संघाचे प्रचारक सतीश कुमार यांचे वादग्रस्त विधान

दोन–तीन नव्हे, चार मुले हवीत!संघाचे प्रचारक सतीश कुमार यांचे वादग्रस्त विधान

देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सतीश कुमार यांनी लोकांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घातली पाहिजे, असे वादग्रस्त विधान केले आहे. दोन-तीन नव्हे, तर चार मुले असली पाहिजेत, असे सांगत मोठय़ा कुटुंबाचे समर्थन केले आहे.

जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संतोष कुमार म्हणाले, संशोधनानुसार ज्या देशांमध्ये युवकांची संख्या कमी आहे तिथे जीडीपी घसरत चालला आहे. त्यामुळे आपल्या देशात युवकांची संख्या जास्त असायला हवी. 2047 मध्ये भारत देश एक विकसित देश बनेल. त्यावेळी आपल्याला म्हाताऱयांचा देश व्हायचे नाही, तर आपली लोकसंख्या ही युवा असली पाहिजे. त्यासाठी आपले कुटुंब छोटे नव्हे, तर मोठे असले पाहिजे, असे ते म्हणाले. पाच-सहा मुले जन्माला घातली पाहिजेत या गोष्टीची मी वकिली करत नाही; परंतु दोन किंवा तीन मुले नक्कीच पाहिजेत. चार मुले असणेसुद्धा चांगली गोष्ट आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;