देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाकडून तूर्त अभय
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. तसा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन दिला होता.
दिल्लीत आज झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, त्याबाबत कोणतीही चर्चा बैठकीत झाली नसल्याने फडणवीस यांना तूर्तास तरी अभय मिळाले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही. महायुती संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कोअर कमिटी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List