जनतेनेच ‘करेक्ट कार्यक्रम’ केला; दमदाटी करणाऱ्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार

जनतेनेच ‘करेक्ट कार्यक्रम’ केला; दमदाटी करणाऱ्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता बारामतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात जात तेथील ग्रामस्थांशी शरद पवार यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दमदाटी करणाऱ्यांचा त्यांनी नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असे ते म्हणाले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं.

गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला. आपली पहिली निवडणूक सोपी नव्हती,कष्ट घ्यावे लागले. त्यानंतर हा भाग तुम्ही सांभाळला, मी राज्यात फिरत होतो. नंतर तीन वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिले, तर देशाच्या लोकशाहीत मलाही निवडून दिले. यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती,देशात आणि जगभरात या मतदारसंघाची चर्चा होती. काही लोकांना फोन येऊ लागले, प्रेमाने, दमदाटीही केली, जे याआधी घडले नव्हते ते या निवडणुकीत पहिला मिळाले. तरीही जनतेला काही सांगावे लागले नाही. जनतेने तुतारी दिल्लीला पाठवली. बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

आता, साहजिकच लोकांच्या कामासाठी आम्हाला अधिक लक्ष घालावं लागेल. आज मोदींची सत्ता आहे, आपली सत्ता नाही, एक वेगळा विचार दाखवायला सुरुवात केली. मोदी समोर कोणी टिकणार नाही, अशी हवा तयार केली. मोदींनी राज्यभर 16 सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं हे माझे भाग्य समजतो. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा लढलो आणि 31 जिंकलो, राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकून दिले. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, इतर कोणीही असो, दमदाटी करणाऱ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही, त्यांनी आपलं मतदान योग्य ठिकाणी केले, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. आज अनेक प्रश्न आहेत,ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ते सोडवले नाहीत. सत्तेचा गैरवापर करणाऱ्याना त्यांची जागा दाखवावी लागेल. आपल्याला सत्ता बदलावी लागेल, सत्ता हातात घेतली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;