पश्चिम बंगालमधील दुर्घटनेला कोण जबाबदार? पंतप्रधान की रेल्वेमंत्री? काँग्रेसचे मोदी सरकारला 7 सवाल

पश्चिम बंगालमधील दुर्घटनेला कोण जबाबदार? पंतप्रधान की रेल्वेमंत्री? काँग्रेसचे मोदी सरकारला 7 सवाल

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातावरून काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दार्जिलिंगमधील रेल्वे अपघातावरून मंगळवारी नरेंद्र मोदी सरकारला सात सवाल केले. रेल्वे प्रशासनाचा हा गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आहे, असा आरोप केला आहे. या रेल्वे दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.

रेल्वे दुर्घटनेवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले आहे. मोठी दुर्घटना झाली की विद्यमान रेल्वेमंत्री कॅमेऱ्यांच्या लवाजम्यासह घटनास्थळावर दाखल होतात. असं वागतात जसं सर्वकाही आलबेल आहे. पंतप्रधान मोदींनी सांगावं, या घटनेला जबाबदार कोण? तुम्ही की रेल्वेमंत्री? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटमधून सात प्रश्न विचारले आहे. या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील, असे खरगे म्हणाले. खरगे यांनी विचारलेले सात प्रश्न पुढील प्रमाणे…

1 – बालासोरमधील भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर बहुचर्चित कवच सुरक्षेत एकही किलोमीटर भाग का जोडण्यात आला नाही?
2 – रेल्वेत किमान 3 लाख पदे रिक्त आहेत. ही पदे गेल्या 10 वर्षांत का भरली नाहीत?
3 – NCRB (2022) च्या रिपोर्टनुसार वेगवेगळ्या रेल्वे दुर्घटनांमध्ये 2017-2021 या कालावधीत 1 लाख नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना जबाबदार कोण? मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लोको पायलटना अनेक तास काम करावे लागते. अपघाताच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण हेच आहे, असे रेल्वे बोर्डानेही मान्य केले आहे. मग ही पदं का भरली नाहीत?
4 – संसदेच्या स्थायी समितीने आपल्या 323 व्या रिपोर्टमध्ये रेल्वे सुरक्षा आयोगाने (CRS) केलेल्या शिफारशींकडे रेल्वे बोर्डाने केलेल्या दुर्लक्षावरून टीका केली होती. फक्त 8 ते 10 टक्के अपघातांची चौकशी होते. मग CRS ला अधिक भक्कम का करत नाही?
5 – CAG नुसार राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष (RRSK) 75 टक्के फंडिंग कमी का केली गेली? हा निधी रेल्वे अधिकारी अनावश्यक गरजांसाठी आणि सुविधांसाठी का वापरत आहेत?
6 – सामान्य स्लीपर क्लासने रेल्वे प्रवास करणं इतकं महाग का झालं आहे? स्लीपर कोचची संख्या का कमी केली गेली?
7 – जबाबदारी झटकण्यासाठी रेल्वे बजेटचा सामवेश सर्वसामान्य बजेटमध्ये केला होता का? जनतेला यावर उत्तर हवे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;